भुजबळांच्या मनात इतका ब्राह्मणद्व्‌ोष आहे तर मग फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत का बसले

0
45

सोलापूर ः वृत्तसंस्था 
छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातला कमी बुद्धीचा माणूस आहे अशी टीका काँग्रेसचे सोलापूरचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे तसेच छगन भुजबळ यांना ब्राह्मण समाजाविषयी इतका आक्षेप होता तर मग ते देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे काय बसले, असेही त्यांनी विचारले आहे.
“छगन भुजबळ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला कमी बुद्धीचा माणूस आहे.ज्या सावित्रीमाई फुले आणि ज्योतीराव फुले यांची नावं घेऊन त्यांनी राजकारण केले.त्यांचे साहित्यही छगन भुजबळ यांनी वाचलेले नाही. त्यांच्या नावे चुकीचा इतिहास भुजबळ सांगत आहेत. सावित्री माईंनी एक पुस्तक लिहिले आहे.त्या पुस्तकाचे नाव आहे काव्यफुले.या पुस्तकात त्यांनी शाळेला सरस्वतीचा दरबार असे म्हटले आहे. छगन भुजबळ हे नाकारणार आहेत का? त्यांचा अभ्यास किती? डिग्री किती, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. छगन भुजबळ हे सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले यांचे साहित्य नाकारण्याचे पाप करत आहेत, मी त्यांचा धिक्कार करतो, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
“छगन भुजबळ यांचा ब्राह्मण समाजावरचा अभ्यासही कमी आहे. ब्राह्मण समाजातल्या अनेक मुलांची नावे ही शिवराय कुलकर्णी, संभाजी कुलकर्णी अशी आहेत.अनेक नावेंतुम्हाला राज्यात आढळतील. भाजपाचे शिवराय कुलकर्णी यांनी तर कुटुंबातल्या प्रत्येकाचं नाव छत्रपती शिवरायांच्या घराण्याला आदर्श मानून ठेवले आहे. सांगण्याचे तात्पर्य इतकंच आहे की, मला अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. छगन भुजबळांना ब्राह्मण्या नावाचा रोग झाला आहे आणि त्यातूनच ते टीका करत सुटतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here