Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मोदींचा शिवसेना युती तोडण्याबाबतचा दावा साफ खोटा: एकनाथ खडसे
    जळगाव

    मोदींचा शिवसेना युती तोडण्याबाबतचा दावा साफ खोटा: एकनाथ खडसे

    SaimatBy SaimatAugust 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना-भाजप युती तोडण्यासंदर्भात केलेले विधान असत्य आहे. पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहे, युती तोडण्याचा निर्णय भाजपने एकमुखाने घेतला होता. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते. खरेतर त्यांनी ही घोषणा करायला हवी होती. मात्र, तेव्हा ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि मी स्व:त उद्धव ठाकरेंना फोन करुन आपली युती आजपासून तुटली असे सांगितले होते.असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे पुढे म्हणाले की, २०१४ ला शिवसेनेने युती तोडली आम्ही स्वत:हून युती तोडली नाही, हे संपूर्ण असत्य आहे. भाजप म्हणून प्रत्येकाने तो निर्णय एकमुखाने घेतला होता.

    काय म्हणाले पंतप्रधान ?
    महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती उद्धव ठाकरेंनी तोडली, भाजपने नव्हे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. मंगळवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एनडीए खासदारांच्या बैठकीला मोदींनी मार्गदर्शन केले. याव्ोळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचीही मोदींनी स्तुती केली. महाराष्ट्रात शिवसेना -भाजपसोबत सत्तेत होती, त्याव्ोळी सामना वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक व्ोळा सहन केले. ठाकरेंना सत्तेत पण राहायचे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे, या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील?

    संजय राऊतांचे उत्तर
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत युती त्यांनीच तोडली असल्याचा आरोप केला होता. यावर खासदार संजय राऊत यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. युती तोडल्याचा फोन खडसेंनी उद्धव ठाकरेंना केला होता. २०१४ मध्ये युती कोणी तोडली, हे मोदींनी तपासाव्ो असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला. युती तोडण्याच्या निर्णयाबाबत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ‌‘सामना‌’ या वृत्तपत्राची दखल घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले. यावरुन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी १२ कोटींचा क्रीडांगण विकास निधी मंजूर

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : ‘ऑपरेशन मुस्कान’ला यश: कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता १५ वर्षीय मुलगी

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : गुजरातमध्ये पत्नीच्या उपचारात गेलेल्या निवृत्त सोनाराचे घर साफ

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.