भुसावळचे १७ भाविक चारधामाची तिर्थयात्रा करुन सुखरूप परतले

0
33

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

येथील बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी नुकतेच त्यांच्या परिवारासह व त्यांचे मित्र मंडळी, समाज बांधव असे सर्व १७ जणांचा गु्रप चारधाम तिर्थयात्रेसाठी भुसावळ येथून गेले होते. अतिशय खडतर रस्ता व कठीण प्रवास पहाडी परिसर, त्यात अधुनमधून खराब हवामान यांचा सामना करुन हरीद्वार, ऋषीकेश, गंगोत्री, यमोनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ अशी सर्व तिर्थक्षेत्राची यात्रा त्यांनी सुखरुप पार करुन शनिवारी भुसावळला पोहोचले. त्यांच्या सोबत डॉ.संगिता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी आणि त्यांचा मित्र परिवार होता. यावेळी बियाणी यांचे भुसावळच्या रेल्वे स्थानकावर ढोल-ताश्यांच्या गजरात समाज बांधव व नातेवाईकांनी जंगी स्वागत केले. रेल्वे स्थानकावर कांताबाई बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रूपेश भांगडिया, संकेत लढ्ढा, राधेश्याम लाहोटी, गोपाळ ठाकूर, प्रवीण भराडीया, मनोज माहेश्वरी, किशोर कोलते, नितीन नंदवणे आदी उपस्थित होते.

बियाणी मिलीटरी स्कुलमध्येही ढोल-ताश्यांच्या गजरात, लेझीम पथकसह जंगी स्वागत करण्यात आले. मनोज बियाणी हे सह परिवार बियाणी मिलीटरी स्कुलमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आले. रस्त्याने जागोजागी त्यांचे औक्षण केले. यावेळी शाळेचा परिसर सजविण्यात आला होता. जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी ‘जय भोले’, ‘ओम नम: शिवाय’, ‘जय बद्रीनाथ’, ‘जय केदारनाथ’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कलशधारी विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here