जळगाव : प्रतिनिधी
दूरदर्शन टॉवरजवळील श्री स्वामीनारायण मंदीरात मंगळवारी अक्षय्यतृतीयेनिमित्त 501 घागरी भरून तर्पण विधी करण्यात आला. तर्पण विधीनंतर घागरी, डांगर, रुमाल व फळे गोरगरींबाना वाटप करण्यात येणार असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले.
रत्नपारखी गुरूजी यांनी पौरोहित्य केले. नयनप्रकाश शास्त्री यांनी अक्षय्यतृतीया यांनी विचार मांडले. कार्यक्रमास गोविंद स्वामी, पी. पी.शास्त्री (सुरत) यांनी मार्गदर्शन केले. अतुल भगत यांनी पुजेची मांडणी केली. नीळकंठ महाजन, युवराज राणे, दिनकर फेगडे, शैलेंद्र पाटील, संदीप पाटील, दिलीप भिरूड, सुनील सरोदे यांच्यासह 500 हरिभक्त उपस्थित होते



