Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»शरद पवारांचे मोठे वक्तव्य ; ‘या’ निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह !
    मुंबई

    शरद पवारांचे मोठे वक्तव्य ; ‘या’ निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह !

    SaimatBy SaimatMay 10, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :- प्रतिनिधी

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र स्वबळावर निवडणूक, युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

    राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने  एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रिपणे निवडणुका लढवायच्या की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी आपले मत मांडले आहे. या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की, प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यावर एकत्र बसावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, आपण सरकार एकत्र चालवतो. त्यामुळे या निवडणुकीसाठीही आघाडी करावी. मात्र या संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही, असे पवार म्हणाले.

     

    आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. एकमेकांची मतं जाणून घेतल्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे पवार म्हणाले.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितले की, जी निवडणूक थांबवली होती, ज्या टप्प्यात थांबवली होती, तिथून सुरू करा. काही ठिकाणी याद्या तयार नाही. काही ठिकाणी हरकती मागवायच्या आहेत. हरकती मागितल्यावर एक महिना जातो. त्यानंतर वॉर्डरचना होते. त्याला एक महिन्याचा कालावधी जातो. त्यानंतर महिला, मागासवर्गीयांसाठी राखीव वॉर्ड रचनेसाठी एक महिना जातो. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी अडीच ते तीन महिने लागतील असे पवार म्हणाले. त्यामुळे १५ दिवसांत निवडणुका जाहीर करणं शक्य नाही, असेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी आरक्षित जागा होती, तिथे आरक्षित वर्गाचा उमेदवार देणार, असे आपण राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितले होते, असे पवार म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.