मक्का पिकावर लष्करीआळी चे संकट

0
53

प्रतिनिधी : आमीन पिंजारी

कजगाव ता भडगाव
निसर्गाच्या अनियमित व ढगाळ लहरीपणामुळेमका पिकावर अनिष्ट परिणाम झाला असून कणीसाच्या वरील भाग हा लष्करी अंळीने मोठ्या प्रमाणात पूर्णता फस्त केला असून मका पिकावर परिणाम झाला आहे , मका उत्पादनातवर दहा ते पंधरा टक्के घट होणार आहे गणेश दुधाळ अवस्थेत असताना रानडुकरांनी पिकाची नासाडी केली व त्याच्यातच शेतीपंपाला होणारा वीजपुरवठा कमी दाबाचा तसेच मध्येच खंडित होत असल्याने शेती पिकांना पाणी भरणे कठीण होतं असून विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे , याच कारणामुळे बरोडा भागातील पिके सुकू लागली आहेत अगदी तोंड आलेले शेतीचे उत्पन्न हातचे जायला नको म्हणून शेतकरी रात्रंदिवस एक करीत आहे , एकामागून एक संकटे बळीराजावर येत असतात, एकूण परिस्थिती काय बळीराजाच्या संकटात वाढ होत उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे खर्चात देखील मोठ्या प्रमाणातवाढ होवून उत्पादन कमी झाले आहे , मका पिकाचे लष्करी आळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here