मुंबई : प्रतिनीधी (यास्मिन शेख )
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कडील खात्यांचा कारभार अखेर अन्य मंत्र्यांकडे सोपविण्यात आला असून तसा आदेश आज राज्यसरकारने काढला आहे .
राज्य सरकार मधील किमान कौशल्य व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना ईडी ने अटक केल्या नंतर त्याच्या राजीनाम्याची मागणी साठी विरोधकांनी रान पेटवले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धातली होती मात्र मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असे राष्ट्रवादी ने एकमताने ठरवले होते. त्यानुसार सरकार ने ही मालिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले असे असले तरी, मालिकांना अटक होऊन जवळपास एक महिना होत आहे. अश्या परिस्थितीत त्यांच्या कडे असलेल्या विभागाचे कामकाज ठप्प झाले असते, त्यामुळे त्या विभागाचे कामकाज हस्तांतरित करणे गरजेचे होते. त्यानुसार आज राज्यसरकारने तसे आदेश आढत मलिक यांच्या कडील किमान कौशल्य विभागाचा कार्यभार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे तर अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कडे दिला आहे.