जळगाव प्रतिनिधी
महीलांच्या विवीध विषयावर महाअधिवेशनात प्रबोधन होणार असल्याने हि एक वैचारीक मेजवानी ठरणार आहे
अंधश्रध्दा ,अनिष्टरूढी कालबाह्य परपंरा यांना फाटा देण्यासाठी विचारांची उंची वाढली पाहीजे आणि ती वाढवण्यासाठी अश्या अधिवेशनांची गरज असते आणि ती पोकळी जिजाऊ ब्रिगेड भरून काढत आहे ,विवीध क्षेत्रात महीला ह्या सक्षम ,भयमुक्त ,त्यांच्यातील शिक्षीतपणा वाढवुन त्यांना आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड आज देश पातळीवर काम करत आहे ,
पिंपळनेर येथे होणा-या अधिवेशनात महाराष्ट्रातुन आलेल्या महीला आपले कला गुण सादर करनार आहेत विविध क्षेत्रातील महीलांना जिजाऊ रत्न व जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित केल्या जाणार आहे.
तरी जळगाव जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन अधिवेशनाचा लाभ घ्यावा असे आव्हान मराठा सेवा संघाचे जि अध्यक्ष अनिल पाटील सचिव ,संजय पाटील कार्याध्यक्ष ,योगेश पाटील ,दिलीप पाटील ,दिनेश कदम ,जेष्ट मार्गदर्शक सुरेश पाटील ,सुरेंद्र पाटील, राम पवार ,प्रा जगदीश पाटील महानगर अध्यक्ष ,हिरामण चव्हाण,सचिन पाटील ,चंद्रकांत देसले,जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हा अध्यक्ष मिरा जंगले,रेखा ढोले ,सटाले मॅडम,प्रियंका पाटील,निता पाटील संभाजी ब्रिगेड चे खुशाल चव्हाण,संजय पाटील ,अमोल पाटील,निवृत्ती ढोले ,अनंता वाघ , शैलेश वराडे विर भगतसिंग परिषदेचे अतुल पाटील अविनाश बावस्कर यांनी केले