Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»घोसला घरकुल प्रकरण……त्या ६१ वगळणी केलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्यात येईल…सरपंच सुवर्णाबाई वाघ यांचा विश्वास…केंद्रीयमंत्री डॉ.भागवत कराड यांची भेट…
    Uncategorized

    घोसला घरकुल प्रकरण……त्या ६१ वगळणी केलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्यात येईल…सरपंच सुवर्णाबाई वाघ यांचा विश्वास…केंद्रीयमंत्री डॉ.भागवत कराड यांची भेट…

    SaimatBy SaimatMarch 31, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

    प्रधानमंत्री आवास योजनेतून पडताळणी समितीने पात्र असलेल्या परंतु चुकीच्या पद्धतीने निकष लावलेल्या घोसला येथील त्या ६१ लाभार्थ्यांना आवास योजनेत समाविष्ट करण्याचा विश्वास सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी गुरुवारी केंद्रीयमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या भेटीनंतर स्पष्ट केल्याने तय ६१ पात्र असलेल्या परंतु तूर्तास वगळणी केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
    प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड प्रपत्रात घोसला ता.सोयगाव येथील २५५ लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली होती.यादी प्राप्त होताच पंचायत समितीच्या वतीने पडताळणी समितीकडून सदरील समाविष्ट लाभार्थ्यांच्या नावांची पडताळणी करून त्यांचे पक्के घरे व कच्ची घरे या वर्गवारीत पडताळणी करण्यात आली परंतु घोसला येथे पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पडताळणी साठी चुकीचा पद्धतीने निकष लावून पडताळणी करण्यात आलेल्या यादीतून ६१ नावांना कात्री लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.पडताळणी समितीची पडताळणी चुकीच्या निकषात झाल्याने पात्र असलेल्या ६१ जणांना समितीने योजनेतून बाद केल्याने त्या वगळलेल्या ६१ जणांचे घरकुलचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे चित्र आढळून आले सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांचेशी या प्रकरणात चर्चा करून हि नावे समाविष्ट करण्यासंबंधी मागणी केली यासाठी पुन्हा विशेष ग्रामसभेचा ठराव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद,यांना पाठविण्यात आलेला असून या प्रकरणी केंद्रीय मंत्री डॉ,भागवत कराड यांची भेट घेवून या नावांची घरकुल योजनेत पुन्हा समावेश करण्यासाठी मागणी निवेर्दनाद्वारे केली असता डॉ.भागवत कराड यांनी दिलेल्या आश्वासानावरून त्या ६१ जणांचा घरकुल योजनेत समाविष्ट होणार असल्याची माहिती सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी दिली आहे त्यामुळे घोसला गावातील त्या ६१ जणांना घरकुल योजनेसाठी दिलासा मिळाला आहे.
    दुसऱ्या टप्प्यासाठी त्या ६१ लाभार्थ्यांची शिफारस करण्यात येणार असल्याने पहिल्या टप्प्यात घोसला गावासाठी १५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट्य प्राप्त झाले असून दुसऱ्या टप्प्यात उद्दिष्ट्य देतांना त्या ६१ लाभार्थ्यांचा विचार करण्यात येईल असेही संकेत प्राप्त झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.