Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»आता वधू-वरांच्या अनुपस्थितीतही करता येणार विवाह नोंदणी
    राष्ट्रीय

    आता वधू-वरांच्या अनुपस्थितीतही करता येणार विवाह नोंदणी

    saimat teamBy saimat teamSeptember 7, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    आता वधू-वरांच्या अनुपस्थितीतही करता येणार विवाह नोंदणी
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, वृत्तसंस्था । विवाहाची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी वधू-वर दोघांनाही विवाह नोंदणी कार्यालयात उपस्थित राहावे लागत होते मात्र आता केरळ न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. विशेष विवाह अधिनियमानुसार एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांची ओळख पटवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असेही न्यायालयाने सुचवले आहे.

    न्यायमूर्ती महम्मद मुश्ताक आणि कौसर एडप्पागठ यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. पक्षकारांची ओळख पटवण्यासाठी फेशिअल रेकग्निशन आणि तत्सम अन्य तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यासाठी केंद्र सरकारने आदेश द्यावेत असं न्यायालयाने म्हटलं आहेय बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यासंबंधीही न्यायालयाने सुचवले आहे.

    खंडपीठाने एकल पीठाचे न्यायाधीश पीबी सुरेश कुमार यांच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. वधू-वर प्रत्यक्ष उपस्थित नसताना त्यांच्या विवाहाची नोंदणी करता येऊ शकणार आहे. मात्र, नोंदणी अधिकार्याला या दोघांची ओळख पटवता येणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ओळख कशी पटवता येईल यावर विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

    या सुनावणीवेळी सरकारचे म्हणणे होते की, विवाह नोंदणी करण्यासाठी वधू-वर या दोघांनीही नोंदणी अधिकार्यासमोर उपस्थित राहणे गरजेचे असणार आहे तसेच वधू किंवा वरापैकी कोणी एक विवाह नोंदणी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असायला हवा. यामुळे परदेशातील लोकांची विवाह नोंदणी शक्य नव्हती. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली तर या निर्णयाचा फायदा बाहेरच्या शहरातील तसेच देशातील जोडप्यांनाही होऊ शकणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.