समर्थ कॉलनीतील एका विवाहितेचा पाच लाख आणण्याकरिता छळ

0
2

जळगाव । शहरातील समर्थ कॉलनीतील एका विवाहितेचा दुकानासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी छळ करणार्‍या पती विरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गायत्री भामरे वय (वय ३३) यांचा पती जितेंद्र अंबादास भामरे (वय ३९, रा. दशरथनगर, जुना खेडी रोड, जळगाव) याने १२ ऑक्टोंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान दुकानासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत म्हणून शिवीगाळ करत शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच गायत्री यांच्या मुलीलाही शिवीगाळ करत, गायत्री यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून गायत्री ह्या माहेरी निघून आल्या.या प्रकरणी गायत्री यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे पती जितेंद्र अंबादास भामरे यांच्या विरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here