गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या

0
4

यावल : तालुका प्रतिनिधी
एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील थोरगव्हाण येथे घडल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे, दरम्यान मयताजवळ एक चिठ्ठी आढळून आल्याने चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे यावल पोलीस पुढील कारवाई काय करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
अतुल गोपाल चौधरी रा. थोरगव्हाण (मयत व्यक्तीचा चुलत भाऊ) याने यावल पोस्टेला खबर दिली की थोरगव्हाण येथील भानुदास मंगल चौधरी वय३८धंदा शेतकरी याने दि.२/५/२०२१रविवार रोजी रात्री आठ वाजेच्या पूर्वी मनवेल शिवारातील त्याच्या शेताचे बांधावरील निंबाचे झाडास दोर बांधून आत्महत्या केली.याबाबत यावल पोलीस स्टेशनला अ. मृ.नंबर २७/२०२१सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय खैरनार करीत आहेत.
दरम्यान, मयताचे खिशात एक चिठ्ठी आढळून आली असल्याने चिठ्ठीमध्ये नमूद एका महिलेला जबाबदार धरण्यात यावे असे लिखाण केले आहे.मयत त्या व्यक्तीला एक ८ त९ेवर्षाचा मुलगा असून त्या मुलास व पतीस त्याची पत्नी सोडून गेल्याने वैफल्यग्रस्त शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे सुद्धा परीसरात बोलले जात आहे पोलीस चौकशी आणि तपासात काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here