वेताळवाडी, धिंगापूर,घोसला शिवारातील पाणवठे कोरडेठाक; वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत
सोयगाव ( प्तारतिनिधी )-
लुक्यातील अजिंठ्याच्या डोंगरातील वेताळवाडी, धिंगापूर आणि घोसला हे तीन प्रमुख पाणवठे कोरडेठाक झाले आहे जंगलात पाण्याचे सर्वदूर दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यामुळे वन्यप्राण्याची घशाची कोरड वाढली आहे त्यामुळे वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत अडकले आहे.
वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले असून अद्यापही या प्रमुख तिन्ही पाणवठ्यात वनविभागाने पाणी उपलब्ध केलेले नाही त्यामुळे वन्यप्राण्यांची तारांबळ उडाली असून गाव परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे
सोयगाव तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वेताळवाडी, धिंगापूर ही दोन्ही वनक्षेत्र वन्यप्राण्याचे अस्तित्व असलेली ठिकाणे म्हणून वनविभागाच्या दप्तरी नोंदी आहेत. या शिवारात बिबट्याचे अस्तित्व आहे परंतु पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने या भागातील बिबट्या, नीलगाय, मोर, हरीण, आदींसह इतर वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे
भर उन्हात या वन्यप्राण्यांचा घसा कोरडा पडला असून पाण्याअभावी सोयगावच्या जंगलातील वन्यप्राणी मरणाच्या दाढेत अडकली आहे अद्यापही वनविभागाने यावर ठोस पावले उचलून वन्यप्राण्यांना पाणी पुरवठा केलेला नाही वनविभागाकडे पिण्याच्या पाण्यासाठी निधीची तरतूद नसल्याचे बोलले जात आहे निधी नसल्याने पाण्याच्या दुष्काळात वन्यप्राणी भयभीत झाले आहेत.
जरंडीच्या धिंगापूर शिवारात बिबट्याचे मोठे अस्तित्व आहे परंतु या वनक्षेत्रात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने बिबटे दिसेनासे झाले आहे त्यामुळे बिबटे कुठे गायब झाले याबाबत चर्चा सुरू आहे