Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड तयार पण सरकारचा हिरवा कंदील कधी
    क्रीडा

    दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड तयार पण सरकारचा हिरवा कंदील कधी

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था
    क्रिकेटमधील हायव्होल्टेज सामना म्हणजे भारत विरूध्द पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तानचे संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा सामन्याचा थरार वेगळाच असतो मात्र, आता बहुतांशी या दोन संघांमधील सामने कोणत्या ना कोणत्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये पाहायला मिळतात. गेल्या १३ वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. या दोन्ही संघांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका २०१३ मध्ये झाली होती पण आता लवकरच दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका पाहायला मिळणार, अशी बातमी आली आहे.
    आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेचे संकेत दिले आहेत मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही.

    पीसीबीने मालिकेचे दिले संकेत
    पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ म्हणाले की, दोन्ही देशांच्या सरकारकडून परवानगी मिळण्यास विलंब होत आहे. दोन्ही देशांच्या सरकारने भारत-पाकिस्तान मालिकेला परवानगी दिली तर लवकरच चाहत्यांना या दोन्ही संघांमधील एक शानदार मालिका पाहायला मिळेल. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड आपापसात खेळायला तयार झाले आहेत.
    दोन्ही देशांमधील सीमेवर वाढलेला तणाव पाहता भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिकेबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, जोपर्यंत पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी थांबत नाही तोपर्यंत दोन्ही देशांदरम्यान कोणतीही द्विपक्षीय मालिका होऊ शकत नाही.
    २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अनेक विभागांमधून तुटले होते.दोन्ही देशांमधील व्यापारावरच परिणाम झाला नाही तर कलेपासून क्रीडापर्यंत सर्वच गोष्टींवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला. पाकिस्तानी गायक आणि अभिनेत्यांना बॉलिवूडमध्ये बंदी असताना, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएल खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.
    काही काळानंतर दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यामुळे पाकिस्तानने भारताला भेट दिली मात्र २०१३ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध पुन्हा बिघडले आणि दोन्ही देशांमधील क्रिकेटही कमी झाले.आता भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आशियाई क्रिकेट परिषद आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यक्रमांदरम्यान एकमेकांशी भिडतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Sports Sector Is Important : युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्त्वाचे : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

    December 23, 2025

    Open Chess Tournament : जी. एच. रायसोनी ओपन बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

    December 22, 2025

    Kho-Kho Competition : खो-खो स्पर्धेच्या जिल्हा संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर, किरण बोदडे

    December 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.