Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वरणगाव पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराची बॅँक गॅरंटी बोगस
    जळगाव

    वरणगाव पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराची बॅँक गॅरंटी बोगस

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 26, 2023Updated:December 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी

    वरणगाव शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा दर्जा खालावल्यामुळे संपूर्ण योजनेचेच तीन तेरा वाजले आहेत. हा विषयच बाजूला आहे. तथापि, या योजनेचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्या ‘अरिहंत’ च्या शहा नावाच्या ठेकेदाराने बँक ग्यारंटीच बोगस दिली आहे. तरीही शासनाचा पगार घेणारे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी निकम, वरणगावचे शेख, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे पवार या तिघांनी संबंधित ठेकेदारासाठी पायघड्या घालून २५ कोटीच्या पाणी योजनेची वाट लावली आहे. ठेकेदाराने बॅँक ग्यॅरंटी बोगस सादर केली असल्याचे उघडकीस येवून देखील तरीही ठेकेदाराला हे तीन शासनाचे प्रतिनिधी पाठिशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
    वरणगाव नगरपरिषदेला महाराष्ट नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनेच्या कामात मोठया प्रमाणात दिरंगाई सुरु आहे. या मंजूर योजनेेबाबत अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. मोजमाफ पुस्तिका (मेजरमेंन्ट बुक) वेगळयाच एसी नावाच्या ठेकेदाराची तर एक मोठे बिल दुसऱ्यांच म्हणजे अरिहंतला काम न करता दिले गेले असल्याचे समोर आले आहे. बॅँक गॅरंटी देखील बोगस सादर केली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे. तीन बिले हे एसी च्या नावाने निघाले तर चौथे बिल काम न करता अरिहंतच्या नावाने काढण्यामागे अर्थपूर्ण गौडबंगाल असल्याची चर्चा आहे.
    विशेष म्हणजे जे काम सुरु होते त्या कामाचा दर्जा देखील खालावला असून पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. शासनाच्या नियमानुसार कोटयावधीचे काम करणारा ठेकेदाराने जर बोगस बॅँक ग्यॅरंटी सादर केली असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, परंतू असे न करता उलट त्यांच अरिहंतला काम देवून त्याच्या नावाचे पेमेंट काढण्याची घाई निकम, शेख, पवार यांना लागलेली दिसते. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालण्याची गरज आहे. ठेकेदार हा निकम,शेख,पवार यांचा जवळचा व्यक्ती तर नाही, पण केवळ आर्थिक कमाईचे साधन म्हणून हे तीन अधिकारी संबधित ठेकेदारावर कारवाई न करता पाठिशी घालत असल्याची चर्चा आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Pahur, Jamner Taluka : दुसऱ्यांच्या उपयोगी येणे हा आनंदाचा मोठा स्रोत आहे.- अशोक देशमुख

    December 24, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025

    Parola : शेतीच्या अनुभवातून विद्यार्थ्यांनी साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.