राज्याचा बारावीचा निकाल 91.88 टक्के ; 94.58 टक्के मुली उत्तीर्ण
पुणे (प्रतिनिधी)-
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. दुपारी 1 पासून विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. 6 मेपासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
बारावीचा यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला. सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.
यंदा निकालाचा टक्का घसरला असून गतवर्षी निकाल 93.37 टक्के लागला होता. यंदा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा निकालाचा टक्का 1.49 नं घसरला आहे.
विभागनिहाय निकाल- कोकण : 96.74 टक्के, पुणे : 91.32 टक्के, कोल्हापूर : 93.64 टक्के, अमरावती : 91.43 टक्के, छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के, नाशिक : 91.31 टक्के, लातूर : 89.46 टक्के, नागपूर : 90.52 टक्के, मुंबई : 92.93 टक्के
बारावीचा शाखानिहाय निकाल – विज्ञान 97.35 टक्के, कला 8.52 टक्के, वाणिज्य 92.68 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम 83.03 टक्के, आयटीआय 82.03 टक्के
बारावीच्या 3373 परीक्षा केंद्रांपैकी गैरप्रकार झाल्याचं आढळल्यामुळे 124 परीक्षा केंद्रांची चौकशी होणार आहे. चौकशी करताना, केंद्रांवर परीक्षेवेळी झालेला गैरप्रकार सिद्ध झाल्यास किंवा त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार आहे.
पुण्यातील 45, नागपुरातील 33, छत्रपती संभाजीनगरमधील 214, मुंबईतील 9, कोल्हापुरातील 7, अमरावतीतील 17, नाशकातील 12, लातुरातील 37 अशा 374 कॉपी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 36,133 एवढी असून त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 83.73 आहे.
नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 12.38 आहे.