Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा विधानसभेत ठराव
    मुंबई

    महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा विधानसभेत ठराव

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 24, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा विधानसभेत ठराव

    मुंबई (प्रतिनिधी)-

    क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावे, या मागणीसाठी विधानसभेत सोमवारी ठराव मंजूर करण्यात आला.

    राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव सभागृहात मांडला होता, त्याला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. हा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

    महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाही, हा ऐतिहासिक ठराव एकमताने संमत झाला. हा ठराव प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. हा ठराव लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, असेही ते म्हणाले.

    महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेच्या दिशेने मोलाचे योगदान दिले. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या या दांपत्याने समाजाच्या दुर्बल घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज देशभरातील महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती साधली आहे, याचे श्रेय या थोर समाजसुधारकांच्या दूरदृष्टीला जातो. शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे स्मरण करत विधानसभेने हा ठराव संमत केला आहे.

    या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासात नवा अध्याय जोडला गेला आहे. या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आणि केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने ‘भारतरत्न’ पुरस्काराचा दर्जा अधिकच उंचावल्याचे मान्यवरांनी सांगितले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.