जिल्ह्यात १३ हजार बचत गटांना ३४० कोटी कर्जाचे वाटप
जळगाव (प्रतिनिधी)-
उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनन्नोती अभियानांतर्गत जिल्ह्यात आयोजित तीन दिवसीय विशेष कॅम्पअंतर्गत पहिल्यादिवशी २० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३० हजार स्वयंसहाय्यता समूहांमध्ये ३ लक्ष महिला आहेत.
जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दिष्टापैकी यावर्षी ३४० कोटी रुपये १३ हजार स्वयंसाहायता समूहांना कर्ज स्वरूपात दिलेले आहे. २६ व २७ मार्चरोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला बचत गटांसाठी विशेष कॅम कर्जवाटप पीएमईजीपी योजना तथा पीएमएफएमई योजना संदर्भात बँक स्तरावर आयोजित करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास २२० शाखांमध्ये कर्ज वाटप कॅम्प सुरू करण्यात आले आहे.
कॅम्प साठी जिल्ह्यातील उमेद अभियानातील केडर तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी यांच्या मदतीने तीन दिवसीय कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी २० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले हक्कदर्शक या संस्थेमार्फत ३३० प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे २२६ महिला बचत गटांना २२. ५० कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आलेले आहे
हे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका टीम करीत आहे. उमेद अभियानातील केडर व कर्मचारी व सर्व बॅक शाखा व्यवस्थापक यांच्या सहकार्याने कर्ज वितरण करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आलेले होते.