पाच हजार वर्षांपासून भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे

0
44

नागपूर : वृत्तसंस्था

राष्ट्रीय स्वयंसेवक संंघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी धर्मनिरपेक्षतेबाबत मोठे विधान केले आहे. भारत हा पाच हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष देश आहे. भारताने लोकांमधील एकजूट आणि मानवी वर्तनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर ठेवले, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. ते आरएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक रंगा हरी यांनी लिहिलेल्या ‘Prithvi Sookta An Ode To Mother Earth’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
“लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी भक्ती, प्रेम आणि समर्पण ठेवावे.आम्ही मातृभूमीला आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा एक महत्त्वाचा घटक मानतो.आपली पाच हजार वर्षे जुनी संस्कृती धर्मनिरपेक्ष आहे.हाच निष्कर्ष सर्व तत्वज्ञानामधून निघतो. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, हीच आपली भावना आहे. हा केवळ सिद्धांत नाही, हे आधी लक्षात घ्या आणि मग त्यानुसार वर्तन करा,” असेही आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले.
“आपल्या देशात खूप विविधता आहे. एकमेकांशी भांडू नका.आम्ही सर्वजण एक आहोत,हा संदेश जगाला देण्यासाठी आपल्या देशाला सक्षम बनवा.हाच भारताच्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश आहे,” असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here