भारताची नेपाळ संघावर २३ धावांनी मात

0
24

हांगझोऊ : वृत्तसंस्था
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यातील क्रिकेट सामना मंगळवारी झाला.ही लढत भारताने २३ धावांनी जिंकली.भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ बाद २०२ धावा केल्या होत्या.भारताकडून यशस्वी जयस्वालने ४९ चेंडूत १०० धावा केल्या.उत्तरादाखल नेपाळला २० षटाकत ९ बाद १७९ धावा करता आल्या. भारताने ही लढत जिंकली असली तरी नेपाळने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचे कौतुक होत आहे.
भारताने फक्त २३ धावांनी विजय मिळवला.या सामन्यात यशस्वीने भलेही शतक केले असले तरी एक खेळाडू होता ज्यामुळे भारताने ही मॅच जिंकली आणि त्याचे नाव आहे रिंकू सिंह. रिंकूने अखेरच्या षटकात विस्फोटक खेळी केली ज्यामुळे भारताने २००च्या पुढे मजल मारली. उत्तम फिनिशर अशी ओळख निर्माण करणाऱ्या रिंकूने सहाव्या क्रमांकाला येत फक्त १५ चेंडूत ३७ धावा कुटल्या. रिंकूने २ चौकार आणि ४ षटकार मारले.त्याचा स्ट्राइक रेट २४६.६६ इतका होता.
जर रिंकूने ही खेळी केली नसती तर भारताचा पराभव झाला असता कारण नेपाळने १७९ धावांपर्यंत मजल मारली होती.नेपाळकडून जर भारताचा पराभव झाला असता तर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियाला मोठा धक्का बसला असता. भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते. आशियाई स्पर्धेत क्रिकेटमध्ये भारत सुवर्णपदकाचा दावेदार आहे.
भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.यशस्वीने टीम इंडियाला जोरदार सुरुवात करून दिली होती. एका बाजूने विकेट पडत असताना यशस्वीने धावांचा वेग कमी केला नाही. जेव्हा यशस्वी बाद झाला तेव्हा असे वाटू लागले की, भारताचा डाव कोसळेल. पण रिंकू मदतीला आला.त्याला शिवम दुबेने (१९ चेंडूत नाबाद २५ धावा) चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूत ५२ धावा लुटल्या.नेपाळविरुद्धच्या अखेरच्या षटकात भारताने ६,४,१,४,२,६,२ अशा २५ धावा वसूल केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here