Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावात आदिवासी कोळी समाजाचे झोपा काढो आंदोलन
    जळगाव

    जळगावात आदिवासी कोळी समाजाचे झोपा काढो आंदोलन

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यांसह अन्य मागण्यांची शासन-प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आदिवासी कोळी समाजबांधवांनी पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, शनिवारी संतप्त समाजबांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर झोपा काढो आंदोलन केले. प्रलंबित मागण्यांसाठी गतवर्षी १० ऑक्टोबरपासून २६ दिवस आदिवासी कोळी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी शासन-प्रशासनाने दोन महिन्यांत सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे चार जानेवारीपासून आदिवासी कोळी आंदोलन समन्वय समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
    आंदोलन शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीक चालू असून, पुंडलिक सोनवणे व प्रभाकर कोळी हे उपोषणास बसले आहेत. आंदोलनास १३ जानेवारी रोजी १० दिवस होऊनही शासन- प्रशासनाकडून दखल न घेतल्यामुळे आदिवासी कोळी समाज आंदोलन समन्वय समितीतर्फे प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात संतप्त समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशाद्वारावरच झोपा काढो आंदोलन केले. आंदोलनात प्रल्हाद सोनवणे, बबलू सपकाळे, विठ्ठल तायडे, सचिन सैंदाणे, सतीश कोळी, राजू सोनवणे, दीपक सोनवणे, रवींद्र सोनवणे, आशा कोळी, वत्सला सपकाळे, धनश्री कोळी, चंद्रभागा कोळी, मीरा कोळी, लता कोळी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.
    प्रा. सोनवणे यांनी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी हे जनतेसाठी आहेत का राजकीय पुढार्यांसाठी आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही त्यांची पाठराखण करत आहेत. शासनाने त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. ते आदिवासी कोळी समाजाची गळचेपी करत आहेत. सरकार आणि जिल्हाधिकार्यांसह प्रांताधिकारी हे झोपेचे सोंग घेत असल्याने त्यांना जाग येण्यासाठी आंदोलन आहे. आगामी निवडणुकांत आदिवासी कोळी समाजाकडून प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jagnade Maharaj : जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव, बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

    December 21, 2025

    Parola : अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम

    December 21, 2025

    healthy life : सातत्य, सकारात्मक विचार, सजगता निरोगी जीवनाचे गमक

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.