नशिबात असेल तर येईल पुन्हा निवडून

0
14

जळगाव : प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली. आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये सर्वांना चारी मुंड्या चित करून पुन्हा भगवा घेऊन येऊ , मात्र नशिबात नसेल तर येणार नाही, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री पाटील म्हणाले की, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण कार्य करत असतो. तथापि, आपण हे कार्य मतांसाठी करत असल्याची टीका विरोधकांकडून होते. तथापि, आपण मतांसाठी कुठलेही काम करत नाही. धर्मा करत असतो. समाजाचं देणं लागतो म्हणून आपण ते करत आहोत. त्यामुळे नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईल, नसेल तर येणार नाही. तथापि, मी माझे कार्य करत आहे आणि ते मरेपर्यंत करत राहणार आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करत मंत्री पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
ज्यांनी हिंदुत्व टिकवले, संप्रदाय टिकवला, असे अनेक कीर्तनकार, संप्रदायाचे लोक आजही भाड्याच्या घरात राहतात, ही आपल्या राज्याची स्थिती असून ती खेदाची बाब आहे, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. मात्र, राज्यात काय होईल हे माहीत नाही, पण जळगाव जिल्ह्यात आमचा संप्रदाय सगळ्या बाबतीत मजबूत राहील, असा आश्वासने यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here