शेतीच्या वादात भावानेच भावाला संपवले

0
21

शेतीच्या वादात भावानेच भावाला संपवले

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-

तालुक्यातील टाकळी शिवारात शेतीच्या जुन्या वादातून चुलतभावाने एकाच्या मदतीने तरुणाचा खून केला आहे. शनिवारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सुनील रामसिंग चव्हाण (वय-३२, रा.टाकळी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सुनील चव्हाण परिवारासह टाकळी गावात वास्तव्याला होता. शेती आणि मजुरी करून तो उदरनिर्वाह करत होता. त्याचे चुलतभाऊ प्रवीण चव्हाणसोबत शेतीचा वाद होता. २५ मार्चरोजी सायंकाळी प्रवीण मित्रांसोबत जेवणासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एसी ४४७३) ने गेला होता. नंतर तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी २६ मार्चरोजी सकाळी सुनील चव्हाण याचे नातेवाईक रस्त्यावरून येत असताना टाकळी शिवारातील सुरेश चव्हाण यांच्या शेताजवळ सुनिल चव्हाण यांचा दुचाकीजवळ मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर संशयास्पद जखमा असल्याने त्याचा खून करण्यात आला असा निष्कर्ष लावण्यात आला होता.

मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मयत सुनील चव्हाणचा भाऊ संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण चव्हाण आणि बाळू जाधव (दोन्ही रा.टाकळी) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील एकाला अटक केल्याचे समजते. तपास स पो नि जयेश पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here