Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या ट्रेकींगवर बंदी
    क्रीडा

    भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या ट्रेकींगवर बंदी

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये सलग पाच विजय मिळवले आहेत. आतापर्यंत एकाही संघाला ही कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघ सध्याच्या घडीला १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे पण या पाच विजयांनंतर भारतीय खेळाडूंंवर ेकींगसाठी बंदी आणली आहे.
    भारतीय संंघाने या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांंगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या पाच संंघांवर विजय मिळवले आहेत. भारताने धरमशाला येथे झालेल्या सामन्यात दमदार विजय मिळवला. भारताचा हा वर्ल्ड कपमधील पाचवा विजय ठरला. या विजयानंतर भारताचे १० गुण झाले आणि त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पण अव्वल स्थान पटकावल्यावर भारतीय खेळाडूंवर एका गोष्टीसाठी बंदी आणण्यात आली आहे.
    भारतीय संघातील खेळाडूंना आता दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताचे खेळाडू धरमशाला येथे दोन दिवस मजा-मस्ती करू शकतात. पण यावेळी भारतीय खेळाडूंवर मात्र यावेळी एका गोष्टीची बंदी घालण्यात आली आहे. धरमशाला हे निसर्गरम्य ठिकाण आहे, हे कोणालाही सांगायला नको. धरमशाला येथे बऱ्याच जागा अशा आहेत की, ज्या मनाला भावतात आणि त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होते. धरमशालाच्या मैदानाच्या मागेच मोठे डोंगर आहेत आणि त्यावर पडणारा बर्फ हा प्रत्येकाला मोहित करत असतो.त्यामुळे भारतीय खेळाडूंंनाही तेथे जाण्याचा मोह होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संंघ व्यवस्थापनाने आता खेळाडूंच्या ट्रेकिंगवर बंदी घातली आहे. खेळाडूंसाठी दोन दिवस सुट्टी नक्कीच असेल पण त्यांना कोणत्याही ट्रेकवर जाता येणार नाही. कारण ट्रेकिंग करताना खेळाडूंना दुखापत होऊ शकते.सध्याच्या घडीला भारतीय संघ भन्नाट फॉर्मात आहे.भारताचे खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे जर कोणत्याही खेळाडूला यावेळी दुखापत झाली तर ती भारतीय संघाला परवडणारी नक्कीच नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंंना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांंच्या ट्रेकिंगवर मात्र बंदी घालण्यात आली आहे.भारताचा आता पुढचा सामना रविवारी २९ ऑक्टोबरला इंग्लंडबरोबर होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon Open-2025 : जळगाव ओपन-२०२५, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ

    December 25, 2025

    Sports Sector Is Important : युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्त्वाचे : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

    December 23, 2025

    Open Chess Tournament : जी. एच. रायसोनी ओपन बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.