जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा, विधानसभा या निवडणुका यापूर्वी या देशात ३१ वर्ष एकत्र पार पडत होत्या. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ आता पंतप्रधान यांची इच्छा दिसते. जेवढ्या दिवस निवडणुका लांबतील, तेवढं नव्याने गठीत झालेली इंडिया मजबूत होईल आणि याचा फटका भाजपाला बसेल, म्हणून हा मध्यममार्ग काढला असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर काही होऊ शकते असा टोलाही खडसे यांनी लगावला आहे.
देशात एक देश एक निवडणूक होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात येत असून भाजपाला आपला पराभव दिसत असल्याने असा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, लवकर निवडणुका घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे. जेवढ्या दिवस निवडणुका लांबतील, तेवढं नव्याने गठीत झालेली इंडिया मजबूत होईल आणि याचा फटका भाजपाला बसेल, म्हणून हा मध्यममार्ग काढला असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक देश एक निवडणुकीची इच्छा दिसत असून भाजपचा पराभव देखील दिसत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे खडसे म्हणाले.