वंचितांच्या हक्कासाठी लढणारे खरे क्रांतिकारी वादळ अण्णाभाऊ साठे

0
30

मलकापूर : प्रतिनिधी
आपल्या शाहिरीतून ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीत महत्वाचे योगदान दिले. अण्णाभाऊंच्या विचारापासून समाजाने प्रेरणा घेऊन आगामी काळात संघर्षासाठी तयार रहावे. त्यामुळे वंचिताच्या हक्कासाठी लढणारे खरे क्रांतीकारक वादळ म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केले. ते वडनेर भोलाजी येथे आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समारंभात बोलत होते. वडनेर भोलजी येथे मातंग समाजाच्यावतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख होते.
यावेळी लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पारेकर वडनेर भो., सरपंच रवींद्र सातव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप बोचरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष दिघे, सोपानराव पानपाटील, राजेंद्र वानखेडे, महेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणूक शिवकालीन बग्गीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा विराजमान करून काढण्यात आली. त्यामुळे बग्गी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पाऊस सुरू असतानाही परिसरातील युवक, महिला, नागरिक सहभागी झाले होते.
अण्णाभाऊंच्या विचारावर
मान्यवरांनी टाकला प्रकाश
याप्रसंगी विजय पारेकर, सोपान पानपाटील यांनी अण्णाभाऊंच्या विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात मातंग समाजाचे नेते दिवंगत मधुकरराव कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यशस्वीतेसाठी लहुजी मंडळाचे पदाधिकारी सुरेश वानखेडे, श्रीकृष्ण वानखेडे, सोपान वानखेडे, रमेश वानखेडे, शेषराव वानखेडे, सिद्धार्थ तायडे, विलास वानखेडे, भास्कर सोनवणे, पिंटू बोदडे, करण बोरले, मंगेश चंदनशिव, शिवाजी वानखेडे, छोटू सकळकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र वानखेडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here