जळगाव : प्र्रतिनिधी
ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या दीडशे वर्षांची परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या भगवान श्रीरामाचा रथोत्सव गुरुवारी, मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावागावातून आलेल्या श्रीरामभक्तांचा जनसागर उसळला होता. कार्तिकी एकादशीला निघणारा जळगावचा श्रीराम रथ हा भारतातील एकमेव असल्याचे म्हटले जाते. अयोध्येतील श्रीराम मंदिरात पुढील वर्षी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची पार्श्वभूमी यंदाच्या रथोत्सवाला लाभली होती.