Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबद्दल इतिहासकारांची समिती नेमा – खासदार उदयनराजे भोसले
    राजकीय

    वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबद्दल इतिहासकारांची समिती नेमा – खासदार उदयनराजे भोसले

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबद्दल इतिहासकारांची समिती नेमा – खासदार उदयनराजे भोसले

    मुंबई (प्रतिनिधी)-

    रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची समिती नेमण्याची मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

    संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी करत राज्य सरकारला ३१ मेपर्यंत निर्णय घ्यावा, असा आग्रह धरला आहे. मात्र, त्यांच्या या मागणीला धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शवला. या वादानंतर इतिहासकारांनी आणि सामाजिक नेत्यांनी मतं मांडली आहेत.

    भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची समिती नेमली जावी. ही समिती चौकशी करून सत्यता तपासून निर्णय घेईल. इतिहासात वाघ्या कुत्र्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे या समाधीबाबत अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यावा,” असे उदयनराजे म्हणाले.

    उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या सन्मानासाठी विशेष कायदा करण्याची गरज असल्याचे सांगितले. “आज समाजात विकृती वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. यावर आळा घालण्यासाठी तातडीने विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तातडीने हे विधेयक मंजूर करावे, ती समाधी कधी आली? का आली? याचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा.” असे ते म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.