Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»ईडीच्या पथकावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला
    राष्ट्रीय

    ईडीच्या पथकावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोलकाता : वृत्तसंस्था
    पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेशन वितरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहाँ यांच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील निवासस्थानी छापा टाकण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातच ईडीच्या पथकावर हल्ला केला. अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. शाहजहाँच्या समर्थकांनी ही तोडफोड केली असल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे.

    अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
    अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीचे अधिकारी सकाळी शेख यांच्या निवासस्थानी जायला निघाले होते. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ईडीच्या आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्याला घेरले. यावेळी त्यांनी ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत वाहनांवर हल्ला केला. ईडीच्या पथकाने निघून जावे, यासाठी गर्दीने दबाव टाकला होता.
    हल्ला झाल्यानंतर ईडीच्या पथकाने आपली वाहने तिथेच सोडून मिळेल त्या मार्गाने तिथून पळ काढला. ईडीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, असा हल्ला होणे, आम्हाला अपेक्षित नव्हते. आमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. केंद्रीय सुरक्षा दलावरही यावेळी हल्ला झाला.
    पश्चिम बंगालमध्ये ईडी अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा हल्ला अतिशय निंदनीय असल्याचे म्हटले आहे.सीव्ही आनंद बोस म्हणाले, “जर सरकार आपल्या मूलभूत कर्तव्यापासून परावृत्त होत असेल तर संविधान आपले काम करेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.