Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»पुढच्या राजकारणासाठी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना लागली मंत्रीपदाची लॉटरी
    मुंबई

    पुढच्या राजकारणासाठी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना लागली मंत्रीपदाची लॉटरी

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    सध्या राज्यात तिसऱ्या मंंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला सुरूवात झाली आहे.या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील अनेक आमदारांंची नावे चर्चेत आहेत पण दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांंची संधी हुकली आहे. दुसऱ्या मंत्रिमंंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यामुळे भरत गोगावलेंवर अन्याय झाल्याची चर्चा रंगलेली असताना यावर आ.भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण करतांना आपल्यासह शिंदे गटातील व भाजपा आमदारांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
    “राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचे आणि भाजपाच्या आमदारांचे मत झाले पण, पुढच्या राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडले आहे, असे भरत गोगावले यांनी सांगितले.ते एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. भरत गोगावले पुढे म्हणाले की, “शिवरायांच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’, त्याप्रमाणे आम्हाला जाणीव झाली की, एकनाथ शिंदे अडचणीत आले तर आमच्या आमदारकीचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित केला.

    देवीला साकडे घातले आहे
    राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्याने अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? असे प्रश्न विचारल्यावर भरत गोगावलेंनी स्पष्ट केले की, “हे आमचे आणि भाजपाच्या आमदारांचे मत झाले पण, भविष्यातील राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडले, हे आम्ही समजून घेतले आहे. अजून १४ मंत्रिपद आहे यासाठी देवीला साकडे घातले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    MPSC Exam Postponed : एमपीएससीची मोठी उलटफेर! 21 डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा जाहीर

    December 8, 2025

    Split in the Grand Alliance : भाजप-शिंदे गट संघर्षात वाढ; २ डिसेंबरच्यानंतर मोठी हालचाल?

    November 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.