Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»पहिल्यांदा विरोधी पक्षांना विश्वासात न घेता संसदेचे विशेष अधिवेशन
    राष्ट्रीय

    पहिल्यांदा विरोधी पक्षांना विश्वासात न घेता संसदेचे विशेष अधिवेशन

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवीदिल्ली : वृत्तसंस्था

    संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. पहिल्यांदा विरोधी पक्षांना अधिवेशनाचा विषय,अजेंडा काहीही सांगण्यात आलेले नाही. देशाच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर ‘इंडिया’मधले पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात. मात्र या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.
    संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे अधिवेशन चालणार आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन असणार आहे. राज्यसभेनेही खासदारांना सूचित केले आहे की १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे तेव्हा सर्व खासदारांनी त्यासाठी उपस्थित रहावे. सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत हे कामकाज चालेल त्यानंतर दुपारी २ ते ६ या वेळात पुढचे कामकाज चालेल असेही नमूद करण्यात आले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा काय? हे अद्याप समोर आलेले नाही.
    या विशेष अधिवेशनाच्या आधी ९ आणि १० सप्टेंबरला जी २० शिखर परिषद पार पडते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अधिवेशन नव्या संसदेत घेतले जाणार आहे. अर्थसंकल्पयी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे अधिवेशनाचे तीन प्रकार आहे. विशेष अधिवेशन तेव्हाच बोलावले जाते जेव्हा एखादी विशेष घटना असते. आता यावेळी सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले अधिवेशन कोणत्या विषयावर चर्चा केली जाणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.