Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला हे शोभेसे नाही; संजय राऊतांचे पुन्हा राज्यपालांवर टीकास्त्र
    राजकीय

    महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला हे शोभेसे नाही; संजय राऊतांचे पुन्हा राज्यपालांवर टीकास्त्र

    saimat teamBy saimat teamMay 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांची यादी अखेर सापडली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे . राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. फाईलवर राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राजभवनाला आम्ही पेढे वाटू.

     

    फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही आणि भुतं असली तर त्यांच्या आसपास असावीत. उच्च न्यायालयाने फाईलवर अद्याप निर्णय का होत नाही, असा प्रश्न विचारला आहे, ती फाईल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे का?” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ही फाईल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने एकमताने १२ सदस्यांची नावे दिलेली आहे. त्यावर आठ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेसे नाही. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामात गतिमानता दाखवली तर महाराष्ट्राची परंपरा गतिमान राहील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

    तसेच सरसंघचालक मोहन भागवत अनेक विषयांवर परखडपणे मत व्यक्त करत असतात. म्हणूनच त्यांच्या भूमिकेला, मताला या देशात आजही महत्त्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेते वाहून आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता, राममंदिराइतकाच महत्त्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा जनतेला होती. देशात आज जे सगळं काही सुरू आहे त्यावर आपलं मत व्यक्त करावं, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026

    Girish Mahajan on Raj thackeray : राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका – “निवडणूक आली की मराठी अस्मिता आठवते!”

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.