Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»न्यूझीलंडकडून भारताला २५२ धावांचे लक्ष्य
    क्रीडा

    न्यूझीलंडकडून भारताला २५२ धावांचे लक्ष्य

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 9, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    न्यूझीलंडकडून भारताला २५२ धावांचे लक्ष्य

    दुबई ( वृत्तसंस्था)-

    चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

    न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना नियमित अंतराने झटके दिले. ११ व्या षटकात कुलदीप यादवने रचिन रवींद्रला बाद करत पहिला धक्का दिला. रचिनने २९ चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने २० व्या षटकात १०० धावांचा टप्पा पार केला.

    डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम यांनी संघाला सावरत १०० धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, २४ व्या षटकात टॉम लॅथम (१४) रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. यानंतर न्यूझीलंडने ३५ व्या षटकात १५० धावांचा टप्पा ओलांडला. पण, भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडल्याने न्यूझीलंडला संधी मिळाली.

    न्यूझीलंडचा डाव सुरळीत सुरू असताना ३८ व्या षटकात ग्लेन फिलिप्स (३४) वरुण चक्रवर्तीने त्रिफळाचीत केला. यामुळे अर्धशतकी भागीदारी तुटली. त्यानंतर विल यंगलाही वरुणने माघारी धाडले. मधल्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी प्रभाव टाकला. ११व्या ते ४०व्या षटकात न्यूझीलंडने ४ विकेट्स गमावल्या आणि १०३ धावा केल्या. यात कुलदीप यादवने २, तर जडेजा आणि वरुणने प्रत्येकी एक गडी बाद केला.

    ४२ व्या षटकात डॅरिल मिशेलने ९१ चेंडूत अर्धशतक साजरे केले. ही त्याची ८ वी अर्धशतकी खेळी ठरली. ४५ व्या षटकात न्यूझीलंडने २०० धावा पार केल्या. मात्र, ४६ व्या षटकात मिशेल (६३) शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माकडे झेलबाद झाला. यानंतर कोहलीच्या थ्रोवर ४९ व्या षटकात मिचेल सँटनर धावबाद झाला. शेवटी, न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर आटोपला आणि आता भारताला विजेतेपदासाठी २५२ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. भारतीय संघ हा सामना सहज जिंकतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Kho-Kho Competition : खो-खो स्पर्धेच्या जिल्हा संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर, किरण बोदडे

    December 17, 2025

    Malkapur : शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूलच्या

    December 16, 2025

    ‘Fun Activities’ Program : ‘गंमत गोष्टी’ उपक्रमात खेळ, वाचनासह नाट्याची मेजवानी

    December 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.