Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»स्वराज्य गाठण्यासाठी युद्धनितीच्या विविध तत्त्वांचा वापर 
    भुसावळ

    स्वराज्य गाठण्यासाठी युद्धनितीच्या विविध तत्त्वांचा वापर 

    saimat teamBy saimat teamFebruary 18, 2022Updated:February 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    भुसावळ प्रतिनिधी– कटकारस्थान करून शत्रूला नामोहरण करणे. शत्रू बेसावध असताना शत्रुसेनेला खिंडार पाडून पहिली तुकडी माघारी आल्यावर दुसऱ्या तुकडीला हल्ला करायला लावणे. अशा प्रकारच्या गनिमी युद्धनितीसह शिवरायांनी युद्धनितीच्या विविध तत्त्वांचा वापर युद्धात केला. शिवरायांनी स्वतःचे युद्धतंत्र विकसित करून स्वराज्य गाठले, असे प्रतिपादन शिवचरित्रकार चंदन पवार (जळगाव) यांनी केले.
    भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात चतुर्थ पुष्प ‘शिवरायांची युद्धनिती’ या विषयावर श्री. पवार यांनी गुंफले. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ. जगदीश पाटील यांची आहे. प्रारंभी शिवचरित्रकार चंदन पवार यांचा परिचय निशा पाटील यांनी करून दिला. श्री. पवार म्हणाले की, इतिहासात डोकावून पाहिले असता युद्धनितीचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात. त्यात प्रकाश युद्धनिती, संरक्षक युद्धनिती, आक्रमक युद्धनिती, धर्म युद्धनिती, कूट युद्धनिती आणि गनिमी युद्धनिती यांचा समावेश होतो. छत्रपती शिवराय हे एक मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी शत्रूच्या मानसिकतेचा विचार करून अनेक किल्ले जिंकले. अंधश्रद्धाळू अफझलखान युद्धावर जाण्याआधी फकीरबाबांचा सल्ला घ्यायचा. शिवरायांना मारण्याचा विडा उचलल्यावर फकीरबाबाला डोळे बंद केल्यावर अफझलखानाचे फक्त धड दिसले. हे ऐकूनही त्याने माघार घेतली नाही. ही सर्व घटना शिवरायांना गुप्तहेराकडून माहिती झाल्यावर त्यांनी हत्ती मारणे, कावळे उडवणे आणि हिरवा ध्वज पाडणे असे अपशकुन घडवून आणले. त्यामुळे अफझलखानाचा रणात नाही पण मनात पराभव करून त्याचे मानसिक खच्चीकरण केले. तसेच शाहिस्तेखानाची बोटे कापून त्याचेही खच्चीकरण केले. शिवरायांनी स्वराज्य गाठण्यासाठी युद्धनितीचा विविध तत्त्वांचा वापर केला. मानसिक खच्चीकरण यासोबतच सूक्ष्म नियोजन, गनिमी डावपेच, चपळ सैन्य, पर्यायी व्यवस्था, दूरदृष्टी, भूगोलाचा सुयोग्य वापर, कमीत कमी सैन्याचा वापर, चकमा देणे अथवा फसवणे, सक्षम हेरखाते, सर्जिकल स्ट्राइक, सैनिकी शिस्त, मावळ्यांवर अतोनात प्रेम करणे असे युद्धनितीचे विविध तत्त्वे त्यांनी वापरले. त्यामुळे त्यांना स्वराज्याचा पल्ला गाठता आला, असेही शिवचरित्रकार चंदन पवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन दिपाली भंगाळे धांडे यांनी तर आभार संजय ताडेकर यांनी मानले.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Railways : शालिमार-लोकमान्य टिळक व ज्ञानेश्वरी एक्सप्रेस पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार

    March 31, 2026

    Bhusawal : भुसावळ–मधुकर महामार्ग काम ठप्प; नागरिकांमध्ये संताप

    March 31, 2026

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.