Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»राजकारणात मुस्लिमांना धर्माच्या आधारावर नाही तर अल्पसंख्यांक म्हणून प्रतिनिधित्व द्या – रामदास आठवले
    राज्य

    राजकारणात मुस्लिमांना धर्माच्या आधारावर नाही तर अल्पसंख्यांक म्हणून प्रतिनिधित्व द्या – रामदास आठवले

    saimat teamBy saimat teamSeptember 9, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । मुस्लिमांना धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्याक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व दिले पाहिजे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले काल परिक्रमा मार्ग गोपाळखार येथील श्री राधाप्रसाद धाम येथे आयोजित संगीत शिरोमणी स्वामी हरिदास आविर्भाव महोत्सवात सहभागी झाले होते. कार्यक्रमात आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. राजकीय पक्षांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार केला पाहिजे, पण तो धर्मावर नसून अल्पसंख्याक समुदाय असण्यावर असावा असे आठवले यांनी म्हटले आहे.

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटींसह उत्तर प्रदेशात उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. रामदास आठवले मंगळवारी गाझियाबादमध्ये होते. २६ तारखेपासून उत्तर प्रदेशमध्ये आरपीआय बहुजन कल्याण यात्रा काढणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. सहारनपूरपासून सुरू होणारी ही यात्रा उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे.

    रामदास आठवले यांनी स्पष्ट केले की, राजकीय पक्षांकडून मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याच्या प्रस्तावाला त्यांचा पाठिंबा आहे पण त्यांना हे प्रतिनिधित्व धर्माच्या आधारावर नाही तर अल्पसंख्याक समुदायाच्या आधारावर द्यायला हवे. तालिबानशी संबंधित एका प्रश्नावर आठवले यांनी सरकारच्या धोरणाचे समर्थन केले आणि म्हणाले, “भारत सरकार सध्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यानुसार पुढील रणनीती ठरवली जाईल.”

    महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या स्थितीबद्दलही रामदास आठवले यांनी यावेळी भाष्य केलं. “महाराष्ट्रातील सरकार आणि सामान्य जनता कोरोना विषाणूविरोधात लढाई लढत आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना मोफत लस पुरवण्याचे मोठे ऐतिहासिक काम करत आहेत,” असे रामदास आठवले यांनी म्हटले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025

    IMD weather update : “महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! आयएमडीचा 14 जिल्ह्यांना तातडीचा येलो अलर्ट”

    December 11, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.