Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक सुरू,राज्यात किती दिवसांचा लॉकडाउन लागणार?
    Uncategorized

    मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक सुरू,राज्यात किती दिवसांचा लॉकडाउन लागणार?

    saimat teamBy saimat teamApril 11, 2021Updated:April 11, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत चर्चा केली जात आहे.

    मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची टास्क फोर्सची बैठक (task force meeting) सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत विचारविनिमय केला जात आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला राज्यातील प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित असून काही इतर तज्ज्ञही सहभागी असल्याचे समजते.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू असलेली ही टास्क फोर्सची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री आपल्या वर्षा या निवासस्थानाहून या बैठकीत उपस्थित झाले आहेत. या बैठकीत राज्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला जात आहे. त्याच प्रमाणे राज्यातील लसीकरणाची स्थितीवर देखील सविस्तर चर्चा केली जात आहे.



    राज्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन हवा की ८ दिवसांचा?

    राज्यात करोनाची एकूण स्थिती पाहता कडक लॉकडाउन लागू करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. राज्यातील स्थितीची आढावा घेत राज्यात किती दिवसांचा लॉकडाउन लावणे गरजेचे आहे याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत विचार केला जाणार आहे. राज्याक फोफावत जाणाऱ्या करोनाला अटकाव करण्यासाठी काय करता येईल यावर या बैठकीत चर्चा करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे राज्यात १४ दिवसांचा लॉकडाउन लागू करावा की ८ दिवसांचा यावर देखील विचारविनियम सुरू असल्याचे समजते.

    राज्यातील स्थितीचा आढावा घेत असताना राज्यात बेडची स्थिती काय आहे, ऑक्सिजनची उपलब्धता किती आहे. रेमडीसिवीरची उपलब्धता किती आहे, सुविधा कशा वाढवता येतील, तसेच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत विचारविनियम होत आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.