Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»महा कृषी ऊर्जा अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हा -आ.शिरीष चौधरी
    जळगाव

    महा कृषी ऊर्जा अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हा -आ.शिरीष चौधरी

    saimat teamBy saimat teamApril 9, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जळगाव : महा कृषी ऊर्जा अभियानात रावेरचे आ.शिरीष चौधरी यांनीही सहभाग घेऊन दोन कृषिपंपांचे ९५ हजार रुपयांचे वीजबिल भरले. कृषिपंपांच्या वीजबिलांत भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान शेतकर्‍यांच्या फायद्याचे आहे. सर्व शेतकर्‍यांनी या अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आ. शिरीष चौधरी यांनी केले आहे.
    या अभियानात कृषिपंपाच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांंपर्यंत सवलत देण्यात येत आहे. निर्लेखन, व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिल्यानंतर राहिलेल्या सुधारीत थकबाकीपैकी पहिल्या वर्षात ५० टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकर्‍यांना संधी आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी ३३ टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
    रावेर विधानसभा मतदारसंघाचे आ.शिरीष चौधरी यांनीही या अभियानात सहभाग घेऊन शेतकर्‍यांना वीजबिल भरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या खिरोदा व कुंभारखेडा येथील दोन कृषिपंपांचे एक लाख ५६ हजार ४८० रुपये वीजबिल होते. महा कृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेतल्याने त्यांना चालू बिलांसह केवळ ९५ हजार रुपये भरावे लागले आहेत. या रकमेचा धनादेश त्यांनी महावितरणच्या सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्याकडे सुपूर्द केला. केवळ बिलात सवलतच नव्हे तर कृषिपंपांना लागणार्‍या विजेच्या पायाभूत सुविधा विकसित करणारे हे अभियान आहे. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांनी या अभियानात आपली वीजबिले भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आ.शिरीष चौधरी यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    MahaVitaran Employees : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्नेहसंमेलनामुळे ‍मिळाली नवी ऊर्जा

    December 19, 2025

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025

    Jamner : चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन गरजूंना ब्लॅकेट वाटप.

    December 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.