Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट घरकुलांची निर्मिती करावी
    जळगाव

    महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट घरकुलांची निर्मिती करावी

    saimat teamBy saimat teamDecember 7, 2020No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारच्या घरकुलांची निर्मिती करावी, राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी असलेले हे अभियान राबवण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या.
    महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीस जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी,धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, बी.ए. बोटे, डिगंबर लोखंडे उपस्थित होते.
    जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, आमदार लताबाई सोनवणे यांच्यासह जिल्हाभरातून विविध पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी हे ऑनलाइन सहभागी झाले होते.दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घरकुलाचा आढावा सादर केला.

    ८३०० लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमीन
    विविध घरकुल योजनेंतर्गत सन २०१६-१७ पासून ९० हजार घरकुल उभारण्याचे उद्दिष्ट आहे.त्यापैकी ५९ हजार घरकुलांना आतापावेतो मंजुरी दिली आहे तर ३६ हजार ८११ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.जिल्ह्यात ८ हजार ३०० लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून देणे बाकी असून, आठ हजार नागरिकांचे अतिक्रमणे नियमित केले.५ हजार ३९० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही अद्याप काम सुरू केलेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Entrepreneur Attacked Brutally : उद्योजकावर जीवघेणा हल्ला ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    December 18, 2025

    Jalgaon : विद्यापीठात संरक्षणशास्त्रावरील आठ संदर्भ ग्रंथांचे

    December 18, 2025

    Jalgaon : विषारी औषध सेवन केल्याने तरूणाचा उपचारावेळी मृत्यू

    December 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.