Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»परिवर्तनच्या कलावंतांनी घेतला कवी कोतवाल यांच्या साहित्याचा शोध
    जळगाव

    परिवर्तनच्या कलावंतांनी घेतला कवी कोतवाल यांच्या साहित्याचा शोध

    saimat teamBy saimat teamJanuary 23, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    परिवर्तन दशकपूर्ती उत्सवाच्या दुसर्‍या नव्वदोत्तर मराठी साहित्यातील कवी अशोक कोतवाल यांच्या साहित्याचा शोध परिवर्तनच्या कलावंतांनी अभिवाचनातून घेतला. ‘नुसताच गलबला’ या त्यांचा गाजलेल्या कविता संग्रहाचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले.
    सामाजिक जाणिवांच्या कविता लेखनाने स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या कोतवालांच्या कवितांनी रसिक अंतर्मुख झाले. सहजसोपी पण आशयगर्भ कविता लिहिणारे अशोक कोतवाल आजच्या पिढीला विचार करायला भाग पाडतात. त्याच्या ’फ्रॉक, मुलं वाद घालताहेत, शिक्षकाची कैफियत, मी गोष्ट करतो तेव्हाची, इश्वर, कॉमन मॅन, पाणी खेळवतंय, पाणी, मोनालिसा, बोलू द्यावं कुणालाही कशावरही, मुली, मधल्या सुट्टीत पळून जाणारी मुले’ या कवितांचे प्रभावीपणे अभिवाचन परिवर्तनच्या कलावंतांनी केले. यात नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, वर्षा चोरडिया, मंगेश कुलकर्णी, वेदांती बच्छाव यांनी कवितेचे सादरीकरण केले. हर्षल पाटील यांनी निवेदनातून कोतवालांच्या कवितांची वैशिष्ट्ये, त्यांच्या साहित्याचा प्रवास मांडला. कवितांना बासरीच्या स्वरांनी किर्तेश बाविस्कर यांनी रंगत आणली. कार्यक्रमाची संकल्पना राजू बाविस्कर यांची तर दिग्दर्शक होरीलसिंग राजपूत यांचे होते. प्रकाशयोजना राहुल निंबाळकर यांची होती. याप्रसंगी कवी सत्यजीत साळवे, बाळकृष्ण सोनवणे, लेखक चंद्रकांत भंडारी यांसह साहित्यिक व रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.