जळगाव ः प्रतिनिधी
हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या दिवशी सुधर्मा संस्थेने शहरातील अत्यंत गरीब अशा दहा कचरावेचक महिलांना किराणा सामानाचे वाटप केले.
कोरोनामुळे समाजातील सर्व जणांचे आर्थिक चक्र थांबले आहे.या गरीब महिलांना यामुळे पुरेसा कचरा,प्लास्टिक कुठे आता मिळत नाहीत त्यामुळे अक्षरशः उपासमारीची त्यांच्यावर वेळ आली आहे.त्यामुळे या आर्थिक संकटात त्यांना किराणा वाटपची मदत देण्यात आली. त्यामध्ये गहू,तांदूळ,तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, बेसन, साखर,तेल,साबण, पोहे, गुळ, मटकी, शेंगदाणे, बिस्किट इत्यादी साहित्य देण्यात आले.
यावेळी या सर्व महिलांना नवीन साडी देखील देण्यात आली. लाभार्थी महिलांमध्ये तांबापुरा येथील गंगाबाई सोनवणे,मंगलाबाई गायकवाड, किरणबाई पवार, आरती सोनवणे,माया सुर्यवंशी, कमलाबाई सोनवणे,कलाबाई सोनवणे, मंगलाबाई लोंढे,यांचा समावेश आहे. वाटप कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी काव्यरत्नावली चौकात झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी या सर्व कचरावेचक महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत पाच-पाच महिलांना शिस्तशीर
किराणा वाटप करण्यात आले.यशस्वीतेसाठी सुनिता नितीन तायडे यांनी सहकार्य केले. किराणा वाटप करून झाल्यानंतर या महिलांनी मनापासून आभार व्यक्त केले.