जळगावात प्रजासत्ताकदिनी निघाली किसान तिरंगा रॅली

0
31

जळगाव ः प्रतिनिधी
संविधान बचाव नागरी कृती समिती, संयुक्त किसान मोर्चा आणि विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने काल रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त किसान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होवून रॅली पं. जवाहरलाल नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत आली व सांगता झाली.
या रॅलीचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष डॉ. करिम सालार, मनियार बिरादरीचे फारुख शेख, प्रा.प्रितीलाल पवार, हरिश्चंद्र सोनवणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, श्रीकांत मोरे, मुस्ताक सालार, फईम पटेल, अयाज अली, रमेश सोनवणे, चंदन बिर्‍हाडे, आकाश मोरे, सत्यशोधकचे विकास मोरे, जयपाल धुरंधर आदींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here