चाळीसगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने कृषी धोरणाच्या विरोधात पारीत केलेले काळे कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी चालवलेल्या शेतकरी उपोषणाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने भारत बंद चे आयोजन केले.
या बंद साठी चाळीसगाव तालुका महिला कांग्रेस, तालुका काँग्रेस व सेवादल तर्फे कचेरी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
शेतकरी विरोधी काळा कायदा त्वरित मागे घ्यावे या आशयाचे निवेदन चाळीसगाव चे तहसीलदार श्री अमोल मोरे साहेब यांना देण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा सौ अर्चना पोळ, तालुका अध्यक्ष अनिल निकम, सेवादल अध्यक्ष आर डी चौधरी, माजी आमदार ईश्वर जाधव, राहुल मोरे, रविंद्र पोळ, रविंद्र जाधव,अलताफ खान जमशेर खान, प्रदिप देशमुख,प्रा.एम एम पाटील,आर जे पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, धनंजय चव्हाण,नितीन पाटील, शिवलाल साबणे सुमनबाई मोची अजय पोलडीया, देविदास खरटमल, बापू चौधरी, लताबाई पगारे, लताबाई वाणी, मंदाताई सूर्यवंशी, सुमनबाई मोची, पुजा मोची, सुमनबाई नंगवारे अदी उपस्थित होते,



