किसान तिरंगा रॅलीचे उद्या २६ रोजी आयोजन

0
28

जळगाव ः प्रतिनिधी
संविधान बचाव नागरी कृती समिती, संयुक्त किसान मोर्चा आणि विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त किसान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होवून रॅली पं. जवाहरलाल नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत येईल. त्यांनतर त्याठिकाणी देश भक्तीपर गीते सादर केली जाणार आहेत. त्यानंतर प्रमुख मान्यवर रॅलीला संबोधित करणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष डॉ. करिम सालार, प्रा. प्रितीलाल पवार, हरिश्चंद्र सोनवणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, श्रीकांत मोरे, मुस्ताक सालार, फईम पटेल, अयाज अली, रमेश सोनवणे, चंदन बिर्‍हाडे, आकाश मोरे, सत्यशोधकचे विकास मोरे, जयपाल धुरंधर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here