Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»उपक्रमांनी खर्‍या अर्थाने सांस्कृतिक ‘परिवर्तन’ घडवले : अतुल जैन
    जळगाव

    उपक्रमांनी खर्‍या अर्थाने सांस्कृतिक ‘परिवर्तन’ घडवले : अतुल जैन

    saimat teamBy saimat teamDecember 21, 2020No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    परिवर्तन उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती करून सांस्कृतिक क्षेत्रात जळगावचा नावलौकिक वाढवत आहे. भाऊंच्या उद्यानातील अ‍ॅम्पी थिएटरचा उद्देश परिवर्तनने पूर्ण केला असल्याचे मत भावांजली महोत्सवाच्या समारोपात जैन उद्योग समूहाचे संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले.भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचा समारोप रविवारी संत कबिरांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणार्‍या ‘हंस अकेला’ने झाला.त्यात दर्शना पवार लिखित ‘बहिणाबाई’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
    प्रा.दीपक बारी यांनी भंवरलाल भाऊंवर लिहिलेली इंग्रजी कवितेची फ्रेम अतुल जैन यांना भेट देण्यात आली. प्रास्ताविक नंदलाल गादिया यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारती सोनवणे, डॉ. अमोल सेठ, यजुर्वेद महाजन, रंगकर्मी जगदीश नेवे उपस्थित होते. ‘माटी कहे कुम्हार सेफ ’, ‘कर गुजराण फकिरीमे’ , ..उड जायेगा हंस अकेला..,ला रसिकांची दाद मिळाली.पद्मश्री भंवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्ताने सुरू असलेला भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचा रविवारी ..हंस अकेला.. या संगीतमय कार्यक्रमाने भावांजलीचा समारोप करण्यात आला. या संगीतमय कार्यक्रमातून कबिरांचा शोध घेण्यात आला. सुदीप्ता सरकार, श्रद्धा कुलकर्णी, अनुषा महाजन, अक्षय गजभिये यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. घुंगट के पट खोल, कहा से आया कहा जावोगे, की चू दीन मोने मोने, पांडुरंग कांती, विश्‍वाचे आर्त, चदरीया झिनी रे झीनी,हमारे राम रहीम, माटी कहे कुम्हारसे, कर गुजराण फकिरीम, उड जायेगा हंस अकेला, कोई नहीं अपना हे दोहे परिवर्तनच्या कलावंतांनी सादर केले. कार्यक्रमात शंभू पाटील यांनी कबिरांचा प्रवास उलगडून दाखवला. यात गायिका सुदीप्ता सरकार, श्रद्धा कुलकर्णी, नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, विशाल कुलकर्णी, अनुषा महाजन, प्रतिक्षा कल्पराज, विनोद पाटील, हर्षदा कोल्हटकर, साक्षी पाटील, अक्षय गजभिये,तबल्यावर मनीष गुरव, बासरी वादक योगेश पाटील यांनी कार्यक्रमात रंगत आणली.तन्वी मलारा यांनी सूत्रसंचालन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.