Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»अमरावती शहरात चार दिवस संचारबंदी; ५० संशयित ताब्यात, इंटरनेट बंद
    राज्य

    अमरावती शहरात चार दिवस संचारबंदी; ५० संशयित ताब्यात, इंटरनेट बंद

    saimat teamBy saimat teamNovember 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती, प्रतिनिधी । शहरात झालेल्या हिंसक घटनेनंतर रविवारी अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली. या प्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून रविवारी सायंकाळपर्यंत ५० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    दरम्यान, त्रिपुरातील कथित हिंसाचार घटनेच्या अफवेने राज्यात निघालेले मोर्चे आणि त्यानंतर अमरावतीसह इतर शहरांत उफाळलेला हिंसाचार या घटनांची चौकशी केली जाईल व दोषींना कठोर शासन केले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी प्रसार माध्यमांना दिली.

    अमरावतीमध्ये ४ दिवस संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सुविधाही बंद केली आहे. रविवारी भाजपने अमरावतीच्या ग्रामीण भागात बंद पुकारला होता. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला. पण एकूण राज्यातील स्थिती नियंत्रणात आहे.

    त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी राज्यात कोणी मोर्चे काढले त्याची माहिती पोलिस घेत आहेत. यातील सहभागी सर्व संघटनांची चौकशी केली जाईल व हिंसाचारात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे वळसे पाटील म्हणाले.

    अमरावतीत तणावपूर्ण शांतता
    शहरात रविवारी तणावपूर्ण शांतता होती. चौकाचौकात पोलिसांची कुमक तैनात होती. संचारबंदी असल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्व प्रमुख मार्ग निर्मनुष्य होते. दरम्यान, रविवारी दुपारी पोलिसांनी शहरातील काही भागातून पथसंचलन केले.

    मालेगावात ५ गुन्हे, १८ जणांना अटक
    मालेगावातील दगडफेक व हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करून १८ जणांना अटक केली आहे. अटकेतील सर्व जण १९ ते ४५ वयोगटातील आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025

    IMD weather update : “महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! आयएमडीचा 14 जिल्ह्यांना तातडीचा येलो अलर्ट”

    December 11, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.