Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»… अखेर कृषी अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त ज्वारीची केली पाहणी
    चोपडा

    … अखेर कृषी अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त ज्वारीची केली पाहणी

    saimat teamBy saimat teamMarch 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा ः प्रतिनिधी
    दि.२३ मार्च सायंदैनिक साईमत मधे वर्डी येथील ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांनी बियाणेबाबत केलेल्या तक्रारीसंबंधी ‘दै.साईमत’ वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित होताच लागलीच या तक्रारीची दखल घेत कृषी अधिकार्‍यांनी थेट तक्रारदार शेतकर्‍यांच्या शेतात भेट देऊन ज्वारी पिकांची पाहणी केली.
    कृषी अधिकार्‍यांनी तक्रारदार शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता ज्वारीची कणसे पुर्ण भरलेले नाहीत त्यामुळे शेतकर्‍यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. प्रशासनाने बियाणे कंपनीला शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाईचे आदेश द्यावेत. अन्यथा, शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदीप पाटील यांनी दिला.
    याप्रसंगी कृषि अधिकारी आर.आर.चौधरी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एम.शिंपी, कृषी विज्ञान केंद्र पालचे कृषी शास्त्रज्ञ अतुल पाटील, हायटेक सिडस्चे विभागीय व्यवस्थापक चेतन गिरासे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, विनोद धनगर, लहुश धनगर, किरण गुर्जर, सचिन सोनवणे, अविनाश शिंदे, कैलास पाटील, साहेबराव पाटील, ओंकार धनगर, संदीप धनगर, भूषण पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
    दरवेळेस बियाणे कंपनी शेतकर्‍यांना सदोष बियाणे पुरवठा करतात व कृषि विभाग नेहमीप्रमाणे पंचनामे करून मोकळा होतो. मात्र, ज्या शेतकर्‍यांचे सदोष बियाणांमुळे नुकसान होते ते कोर्टकचेरी व ग्राहक मंचामध्ये फेरफटका मारून जेरीस येतात. कृषि विभागाने शेतकर्‍यांना बोगस बियाणे पुरवठा करणार्‍या कंपन्यांवर वेळीच बंदी आणावी व शेतकर्‍यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी देखील संदीप पाटील यांनी केली आहे.
    ‘सायंदैनिक साईमत’मध्ये वृत्त प्रकाशित करून शेतकर्‍यांच्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल शेतकर्‍यांतर्फे जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे आभार मानण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chopda : एक दिवसात 1,251 प्रकरणांचे निकालीकरण; चोपडा राष्ट्रीय लोक अदालतीत धक्कादायक कामगिरी

    December 13, 2025

    Chopra : लोणीत गोवंश कत्तलीवरून तरुणांवर प्राणघातक हल्ला

    December 12, 2025

    Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी बाटली वाटप

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.