विहीरीत पडल्याने तरूणाचा मृत्यू

0
40

जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वराड येथे शेतातील विहरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल भरत जाधव (वय-२८) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील वराड येथे राहूल हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो मानसिक रुग्ण असल्याने तो अनेक दिवस घरी देखील जात नव्हता. शुक्रवारी १३ मे रोजी सकाळी मजूर शेतात काम करीत असतांना ते पाणी पिण्यासाठी हिलाल पुंडलिक नेरे यांच्या शेतातील विहरीजवळ गेले. दरम्यान, ते विहरीतून पाणी काढत असतांना त्यांना विहरीत मृतदेह तरंगतांना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ शेतमालकाला दिली. शेतमालकासह सरपंच संदिप सुरळकर, राजेंद्र जाधव, भाऊलाल जाधव, पोलिस कर्मचारी राजेंद्र उगले यांच्यासह ग्रामस्थांनी शेतात धाव घेत पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहरीतून बाहेर काढला. यावेळी तो मृतदेह राहूल जाधवचा असल्याची समजले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here